शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शिराळ्यात विधानसभेला चौरंगी लढतीचा डाव- निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:11 IST

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना

ठळक मुद्देसम्राट महाडिक, अभिजित पाटील रिंगणात थांबण्यासाठी प्रयत्न, नवी समीकरणे

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना अद्याप उभारी आलेली नाही. आता वाळवा तालुक्यातील सम्राट महाडिक, अभिजित पाटील यांनाही शिराळा मतदारसंघ महत्त्वाचा वाटू लागला आहे. हे दोघेही उभे रहावेत म्हणून एका नेत्याने देव पाण्यात घातले आहेत.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक, मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख विकासाचा डांगोरा पिटत आहेत. या मतदार संघातील डोंगरी भागाचा विकास झाला पाहिजे, मुंबईकडे वळणारा तरुण भागातच राहिला पाहिजे, यासाठी शिराळ्यात औद्योगिक क्षेत्र तयार केले, याचेही श्रेय लाटण्यासाठी नेते सरसावले. उद्योगांच्या नावाखाली नेत्यांच्या बगलबच्चांनीच तेथील भूखंड लाटले. त्यानंतर ते भूखंड चढ्या भावाने विकले, तर काहींनी अनुदान हाणले. त्यामुळे या परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळालेच नाही. हाच मुद्दा घेऊन सम्राट महाडिक यांनी रणशिंग फुंकले आहे.

मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील तरुण सम्राट महाडिक यांच्या मागे असल्याचा दावा महाडिक युवा शक्तीकडून केला जात आहे. मात्र याचा आनंद राष्ट्रवादीतील नेत्यांना होत आहे. महाडिक गटाचा फटका आमदार नाईक गटाला बसेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील शिराळा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. त्यामागेही राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.कुणाची ताकद, कोण कमजोर?शिराळा मतदार संघात समाविष्ट, परंतु वाळवा तालुक्यातील ४९ गावांमध्ये आमदार जयंत पाटील यांची सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. येलूर, पेठ जिल्हा परिषद मतदार संघात महाडिक गट वरचढ आहे, तर आमदार शिवाजीराव नाईक यांचाही ४९ गावात उल्लेखनीय लोकसंपर्क आहे. विविध फंडातून राष्टÑवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी विकासकामे केली आहेत. निष्ठावान काँग्रेसचे मतदार बोटावर मोजण्याएवढेच राहिले आहेत. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची ताकद कमकुवत आहे. 

२००९ च्या निवडणुकीत आम्ही मानसिंगराव नाईक यांना मदत केली. सम्राट महाडिक आणि अभिजित पाटील यांच्या भूमिकेने काहींचा फायदा होईल, असे वाटणे चुकीचे ठरेल. ते दोघे आमचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्यापासून काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र होते. आता त्यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. आघाडी झाल्यास शिराळा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे.- सत्यजित देशमुख, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस.